शैक्षणिक माहितीचा स्रोत
सुजीत फलके
सहशिक्षक,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटनांद्रावाडी ता.सिल्लोड जि.औरंगाबाद

��!...आपले स्वागत आहे शैक्षणिक माहितीच्या स्रोतरूपी माझ्या या ब्लॉगवर...!��


W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools
W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools

Pages

Wednesday, 11 October 2017

वीज कशी पडते ?

विज कशि पडते






विजविज कशि पडते



खरं तर वीज पडते तेव्हा आपल्याला ती दिसत नाही, हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्याचा धक्का बसेल. विजा नेहमी कमीत-कमी रोध म्हणजेच विरोध असलेला मार्ग निवडतात. थोडक्यात कोणता मार्ग सोयीचा आहे, याचा अंदाज घेऊनच वीज पडते. विजेचे मार्ग साधारणपणे खालील प्रकारचे असतात.

अ) एका ढगाकडून दुसऱ्या ढगाकडे

ब) एकाच ढगात एका भागातून दुसऱ्या भागाकडे

क) ढगातून हवेकडे

ड) ढगातून जमिनीकडे

इ) अ ते ड यांच्या दोन किंवा अधिक मिश्रणातून बनणाऱ्या विजेच्या शलाका प्रमाणे असतो.

एका सेकंदाच्या दहा हजाराव्या भागामध्ये वीज चमकण्याची प्रक्रिया पूर्ण होते. विजा कोसळतानाची पूर्ण क्रिया वेगाने मुख्यतः पाच उप-क्रियांच्या टप्प्यांत विभागली जाते. त्यातून आपल्याला विजेचा लखलखाट दिसून गडगडाट एेकू येतो.



स्टेप लॅडर



पहिल्या क्रियेत शिडीप्रमाणे अंदाज घेत हवेतल्या विद्युत भारीत (चार्जड्) आयन्सचा मार्ग तयार होतो. याला ‘स्टेप लॅडर’ म्हणजे विजेच्या ‘शिडीच्या पायऱ्या’ असे म्हणतात.



स्ट्रिमर





पहिली क्रिया होतांना विशिष्ट अंतर पूर्ण करेपर्यंत दुसरी क्रिया सुरू होते. जेव्हा ढगाकडून हवेत ‘स्टेप लॅडर’ बनत खाली येऊ लागते तेव्हा जमिनीकडून तशाच प्रकारे ‘आयन्सची श्रंखला’ तयार होऊ लागते. आयन्सच्या या श्रृंखलेला ‘स्ट्रिमर’ म्हणजे विजेसाठीची ‘मार्गिका’ असे म्हणतात.

स्टेप लॅडर व स्ट्रिमरचा ‘शेकहॅंड’

जमिनीकडून वर जाणारी ‘स्ट्रिमर’ तसेच ढगाकडून खाली येत असलेली ‘स्टेप लॅडर’ यांचा ‘शेकहॅंड’ झाला की वीज पडली असे समजावे. ‘स्टेप लॅडर’ व ‘स्ट्रिमर’चा मिलाप होतो तेव्हा ढगाकडून जमिनीकडे विद्युतधारा वाहून नेली जाते.

रिटर्न स्ट्रोक



‘रिटर्न स्ट्रोक’ म्हणजे



 विद्युतधारेचा ‘परतीचा टोला’ होय. ढगात असलेल्या चार्जचे पूर्ण उदासीनीकरण घडण्यासाठीच्या प्रयत्नात ‘रिटर्न स्ट्रोक’मध्ये जमिनीकडून ढगाकडे विद्युतधारा वाहते. वीज पडल्यावर आपल्याला जो लखलखाट दिसतो तो विजेचा परतीचा मार्ग असतो.

डार्ट लॅडर

एकदा वीज पडते तेव्हा एकापेक्षा जास्त ‘रिटर्न स्ट्रोक’देखील पाहायला मिळतात. यांची संख्या अनेकदा ३५ इतकी मोजली गेली आहे. जेव्हा हे अनेक रिटर्न स्ट्रोक हवेबरोबर जागा बदलत सरकतात तेव्हा त्यांना ‘डार्ट लॅडर’ असे म्हटले जाते.

----------------------- कशि पडते



खरं तर वीज पडते तेव्हा आपल्याला ती दिसत नाही, हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्याचा धक्का बसेल. विजा नेहमी कमीत-कमी रोध म्हणजेच विरोध असलेला मार्ग निवडतात. थोडक्यात कोणता मार्ग सोयीचा आहे, याचा अंदाज घेऊनच वीज पडते. विजेचे मार्ग साधारणपणे खालील प्रकारचे असतात.

अ) एका ढगाकडून दुसऱ्या ढगाकडे

ब) एकाच ढगात एका भागातून दुसऱ्या भागाकडे

क) ढगातून हवेकडे

ड) ढगातून जमिनीकडे

इ) अ ते ड यांच्या दोन किंवा अधिक मिश्रणातून बनणाऱ्या विजेच्या शलाका प्रमाणे असतो.

एका सेकंदाच्या दहा हजाराव्या भागामध्ये वीज चमकण्याची प्रक्रिया पूर्ण होते. विजा कोसळतानाची पूर्ण क्रिया वेगाने मुख्यतः पाच उप-क्रियांच्या टप्प्यांत विभागली जाते. त्यातून आपल्याला विजेचा लखलखाट दिसून गडगडाट एेकू येतो.



स्टेप लॅडर



पहिल्या क्रियेत शिडीप्रमाणे अंदाज घेत हवेतल्या विद्युत भारीत (चार्जड्) आयन्सचा मार्ग तयार होतो. याला ‘स्टेप लॅडर’ म्हणजे विजेच्या ‘शिडीच्या पायऱ्या’ असे म्हणतात.



स्ट्रिमर





पहिली क्रिया होतांना विशिष्ट अंतर पूर्ण करेपर्यंत दुसरी क्रिया सुरू होते. जेव्हा ढगाकडून हवेत ‘स्टेप लॅडर’ बनत खाली येऊ लागते तेव्हा जमिनीकडून तशाच प्रकारे ‘आयन्सची श्रंखला’ तयार होऊ लागते. आयन्सच्या या श्रृंखलेला ‘स्ट्रिमर’ म्हणजे विजेसाठीची ‘मार्गिका’ असे म्हणतात.

स्टेप लॅडर व स्ट्रिमरचा ‘शेकहॅंड’

जमिनीकडून वर जाणारी ‘स्ट्रिमर’ तसेच ढगाकडून खाली येत असलेली ‘स्टेप लॅडर’ यांचा ‘शेकहॅंड’ झाला की वीज पडली असे समजावे. ‘स्टेप लॅडर’ व ‘स्ट्रिमर’चा मिलाप होतो तेव्हा ढगाकडून जमिनीकडे विद्युतधारा वाहून नेली जाते.

रिटर्न स्ट्रोक



‘रिटर्न स्ट्रोक’ म्हणजे



 विद्युतधारेचा ‘परतीचा टोला’ होय. ढगात असलेल्या चार्जचे पूर्ण उदासीनीकरण घडण्यासाठीच्या प्रयत्नात ‘रिटर्न स्ट्रोक’मध्ये जमिनीकडून ढगाकडे विद्युतधारा वाहते. वीज पडल्यावर आपल्याला जो लखलखाट दिसतो तो विजेचा परतीचा मार्ग असतो.

डार्ट लॅडर

एकदा वीज पडते तेव्हा एकापेक्षा जास्त ‘रिटर्न स्ट्रोक’देखील पाहायला मिळतात. यांची संख्या अनेकदा ३५ इतकी मोजली गेली आहे. जेव्हा हे अनेक रिटर्न स्ट्रोक हवेबरोबर जागा बदलत सरकतात तेव्हा त्यांना ‘डार्ट लॅडर’ असे म्हटले जाते.

Thursday, 5 October 2017

आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती

💎 *आद्यकवी महर्षि वाल्मिकी* 💎

"अद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती च्या हार्दिक शुभेच्छा"
                    -जयराज सोदले.

📝 *"रामायण"* वाल्मिकी ऋषींद्वारे रचलेले एक महाकाव्य असून त्याला हिंदू धर्मामधे पवित्रग्रंथाचा दर्जा आहे. संशोधनानुसार रामायणाचा रचनाकाळ इ.स.पू. पाचवे शतक ते इ.स.पू. पहिले शतक यादरम्यान निर्धारित केला गेला आहे.

📕महर्षि वाल्मीकिंना काही लोक निम्न जातिचे मानतात. पण वाल्मीकि रामायण तसेच अध्यात्म रामायण येथे त्यांना प्रचेताचे पुत्र मानले गेले आहे. मनुस्मृतिनुसार प्रचेतस यास वसिष्ठ, भृगु आदिंचा बंधु म्हाटले आहे. व्याध जन्मात शंख ऋषिंच्या सत्संगाने रामनामाच्या जपाने ते दुसर्या जन्मात अग्निशर्मा या नावाने होते. सप्तर्षिंच्या सत्संगाने मरा मराचा दीर्घकाळ जप, अंगावर वारूळ वाढेपर्यंत केल्याने ते पुढे वाल्मीकि नामाने प्रसिद्ध झाले आणि त्यांनी वाल्मीकि रामायणाची रचना केली. वाल्मिकी वर्णित राजनीति अत्यंत उच्च कोटीची आहे. तिच्यापुढे सर्व राजनैतिक विचार तुच्छ प्रतीत होतात.

🌴रामायणाची मुख्य कथा अयोध्येचा राजपुत्र रामाची पत्नी सीतेचे रावणाकरवी अपहरण, आणि तत्पश्चात रामहस्ते रावणाचा संहार अशी आहे. ग्रंथानुसार वाल्मिकी ऋषींनी रचलेल्या या काव्याचा रामाच्या मुलांनी लव-कुश प्रचार केला.नंतरच्या काळातील संस्कृत काव्यांच्या छंद रचनाशैलीवर रामायणाचा गाढा प्रभाव दिसून येतो. रामायणाचा उल्लेख नीतीकथा, तात्विक व भक्तिसंबंधित चर्चांमध्ये येतो. राम , सीता , लक्ष्मण , भरत , हनुमान व कथेचा खलनायक रावण आदि पात्रेभारतीय सांस्कृतिक प्रज्ञेचा हिस्सा बनले आहेत. रामायणाचा प्राचीन भारताच्या प्रमुख साहित्यकृतींवर व भारतीय उपखंडातीलकला व संस्कृतीवर सखोल प्रभाव दिसतो.

🌴सर्वात जुने हस्तलिखित ११व्या शतकातील आहे वाल्मीकी रामायणाच्या प्रतींच्या उत्तर भारत व दक्षिण भारत प्रदेशातील अनेक प्रादेशिक आवृत्या मिळाल्या आहेत. यात रामाच्या जन्मापासून अवतारसमाप्तीपर्यंतचे जीवन सात कांडांत विभाजित केले आहे.

1⃣ *बाल कांड* – रामाचा जन्म, बाल्य, वनवासी होण्यापूर्वीचे अयोध्यॆतील दिवस, विश्वामित्रांनी राक्षससंहाराकरता वनात नेणे, सीता स्वयंवर- आदि घटनांचा समावेश.

2⃣ *अयोध्या कांड* – या भागात कैकेयी दशरथाद्वारे रामास वनवासात धाडते. दशरथाचा पुत्रशोकाने मृत्यु होतो.

3⃣ *अरण्य कांड* – वनवासातील रामाचे जीवन, सीतॆचे अपहरण या भागात चित्रित केली आहे.

4⃣ *किष्किंधा कांड* – सीतॆच्या शोधातील राम किष्किंधेच्या वानर साम्राज्यात दाखल होतो. तिथे त्यास सुग्रीव, हनुमंत आदि कपिवीर भेटतात. वानरसैन्य सीतॆसहुडकणे प्रारंभ करते.

5⃣ *सुंदर कांड* – या भागात हनुमंताचे विस्ताराने वर्णन येते. हनुमंताचे आणखी एक नाव म्हणजे सुंदर. या नावावरून या कांडास सुंदर कांड असे नाव आहे. हनुमान सम्रुद्र लंघून लंकॆत प्रवेशितो. लंकादहन घडवितो. सीतॆच्या रावणाच्या राज्यातील अशोकवन येथील उपस्थितीबद्दल रामास कळवितो.

6⃣ *युद्ध कांड* - या भागात राम - रावण यांचे युद्ध, रावण संहार, त्यानंतर रामाचे सपरिवार अयोध्येस पुनरागमन व श्रीरामाचा पट्टाभिषेक यांचे वर्णन आहे.

7⃣ *उत्तर कांड* – रामाने सीतेचा लोकनिंदेमुळे केलेला त्याग, लव-कुश यांचा जन्म, रामावतार समाप्ती यांचे वर्णन.

💥वाल्मिकी रामायण हे एकुण २४,००० श्लोकांचे आहे. सात कांडात, एकुण ५०० प्रकरणांचा विस्तार एवढे साहित्य एका रामायणात आहे. विविध राजे, तत्कालिन संस्कृती, एकमेकांसोबतचे राजकारण, समाज, आचार विचार ह्यांचा समग्र समूह म्हणजे रामायण. भारतीय संस्कृती त्यातून पुरेपूर दिसते त्यामुळे रामायण हे वेदकालीन संस्कृती वा इ स पूर्व संस्कृती मधील फार मोठा मैलाचा दगड ठरते. बाल, अयोध्या, आरण्य, किष्किंधा, सुंदर, युद्ध आणि उत्तरकांड हे ते सात कांड आहेत. रामायण हे वाल्मिकी ऋषींनी लिहीले व ते ह्यासर्वाचे साक्षीदार होते असे आपण मानतो. पण त्याच बरोबर वाल्याचा वाल्मिकी हे राम नाम उलटे जपल्यामुळे मरा मरा ऋषी झाले अशी कथाही आपल्याला सांगितली गेली.

🔷रामायणाचा प्राचिन भारताच्या प्रमुख साहित्यकृतीवर व भारतीय उपखंडातील कला व संस्कृतीवर सखोल प्रभाव दिसतो.

🎯वाल्मिकी रामायणात सांगतलेला प्रभु श्रीराम हा मर्यादा पुरूषोत्तम आहे.
👉🏻
कवीच्या दिव्य प्रतिभेतून साकार झालेले हे महन्मंगल व्यक्तिमत्व आहे.
👉🏻
 त्यानुसार मानवी जीवनाशी संबंधित असलेल्या सर्व भूमिकांचा परमोच्च, उत्तुंग आदर्श म्हणजे श्रीप्रभू रामचंद्र.

✅ *आदर्श राजा,*
✅ *आदर्श पुत्र,*
✅ *आदर्श बंधू,*
✅ *आदर्श सखा,*
✅ *आदर्श पती,*
✅ *आदर्श नेता,*
✅ *आदर्श विराग्रणी,*

✅ *'जननि जन्म भूमिश्च स्वर्गादपि गरियसी'*
असा
देशभक्तीचा उत्तुंग आदर्श आचरणात आणणारा मातृभक्त आणि

✅ *'मरणान्तानि वैराणी न मे कृतानिच'*

हा प्रत्यक्ष
वैरी व शत्रूच्याही बाबतीत अंतःकरणाची विशालता दाखवणारा हा मानव आहे.

*"महर्षी वाल्मिकी" नी 'रामायणाच्या' माध्यमातून*
✅ *भारतीय संस्कृतीचे जीवनव्यापी शाश्वत मूल्ये मांडली.*

त्यांचा प्रभाव संपूर्ण जगात पसरला.🎯

    🙏🏻 *जयराज सोदले*🙏🏻

https://jayrajsodle.blogspot.in

Wednesday, 4 October 2017

कुठे आहे ती दिवाळी ?

*कुठे गेले ते दिवस*


एव्हाना सहामाही परीक्षा संपून सुट्टी सुरु
झालेली असायची. दसऱ्यापासूनच
थंडी पडायची आणि दिवाळी येईपर्यंत ती वाढत जायची.

दिवसभर खेळून हाथ-पाय थंडीने उकलायचे.
किल्ला गारूच्या मातीने भगवा करून टाकायचा. त्यावरचे
हळीव चांगलेच वाढायचे. सलाईनच्या कारंज्यात दिवसभर
पाणी भरत बसायचे. वाऱ्याने मावळे पडायचे. चिखल सुकून
बुरुजाला भेगा पडायच्या. दिवस जायचा 'गड'
राखण्यात !!

फटाक्यांची भलीमोठी यादी कधीच तयार असायची. मग
मातीचा गल्ला फोडला जायचा. त्यात
सापडायची इकडून तिकडून उचललेली आठ-आणे
रुपयाची नाणी. फटाके आणायला खारीचा वाटा.
फटाक्याच्या दुकानात अधाश्यासारख व्हायचं. लवंगी,
लक्ष्मी, सुतळी, कनकावळे, भुईनुळे, चक्र, फुलझडी,
नागगोळी, टिकल्या आणि पिस्तुल. पिशवी गच्च भरायची.
एकदम 'श्रीमंत' झाल्यासारखं वाटायचं.

घरी येवून
छोट्या भावाबरोबर त्याची वाटणी व्हायची. अगदी वात
गळालेल्या फटाक्यांची सुद्धा !! हाताला छान
चांदीसारखा दारूचा रंग लागायचा. भारी वाटायचं. हीच
काय ती दारू माहिती तेव्हाची !!

'पोरानो, लवकर झोपा. सकाळी अभ्यंगस्नानाला उठायचं
आहे' - आजी सांगायची. पण इथे झोप
कोणाला असायची. कुडकुडणारी थंडी, बाहेर मंद प्रकाश,
दूरवरून कोंबड्याची बांग ऐकू यायची. आईला उठवायचं.
न्हाणीघरात पितळी बंब पेटायचा. त्याच्या जवळ बसून
अंगात उब आणायची. आई उटणे लावायची. गार लागायचं.
तो गरम पाण्याचा तांब्या अंगावर घेतला कि छान
वाटायचं. त्या पाण्याला धुराचा वास असायचा.
मला तो आवडायचा. 'मोती' साबण छोट्याश्या हातात
मावायचा नाही आणि बादलीतल पाणी संपूच नाही असं
वाटायचं.

देवघरात आई आम्हाला ओवाळायची. नवे कोरे कपडे
अंगात घालायची. डोक्याला वासाचं तेल लावायची. ते
गोठायचं नाही म्हणून बर वाटायचं.
*मोठ्याच्या पाया पडून फटाके वाजवायला पळायचो फक्त एक लवंगी सर वाजवायचा बाकी सगळे सोडून, पुरवून पुरवून. त्यातच मज्जा असते*
दिवस हळूहळू
उजाडायचा. न वाजलेले फटाके सापडायचे. केवढाजास्त
आनंद व्हायचा त्याचा.
आता हे सगळे लिहिताना विचार येतोय, कधी जगलो असं
शेवटचं? लहान होवून, छोट्या गोष्टीत रमून, निरागसपणे.

सर्वात जास्त आवडणारी दिवाळी मागे पडलीये
का
आपण खूप पुढे आलोय ?

माझी शाळा फोटो अल्बम

...
DOWNLOAD BOOKS FOR FREE

शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन

परिवर्तनशील शिक्षण

दिवास्वप्न

तोत्तोचान

टीचर

मुले नापास कां होतात?

सहज शिक्षणाची प्रयोगशाळा

पहिला अध्यापक

लिंगभाव समजून घेताना

प्रिय बाई

धोका शाळा

शिक्षणाचे जादुभरे बेट

समरहिल

मुले खेळतात जग मोठं करतात

कोसबाडच्या टेकडीवरून

*YOUR LOCATION*
WHAT DAY & DATE IS TODAY ?